Friday, 21 March 2014

क्रिकेट बदलेगा 'एक ओवरमें'


अन्य खेळ बघितले, तर असं दिसतं की सगळ्यांचा फॉर्मट एक, वेळेच बंधन एक, कर्णधार एक आणि कौशल्य, थोड्या फार फरकाने सारखे. पण, क्रिकेट हा खेळ मात्र याला अपवाद आहे.  क्रिकेटची उत्क्रान्ती त्याच्या जन्मापासुन सतत वाढतच गेली. कधी बॅट, कधी बॉल, तर कधी फिल्डिंग, गोष्टी बदलतच गेल्या. गतीशील परिवर्तन हा फंडा नंतर आणखीन गतीशील झाला. नियम बदलत गेले, अर्थातच, बॅटिंग ही क्रिकेटची आवडती गर्लफ्रेन्ड असल्यामुळे बॉलिंगपेक्षा तिला झुकते माप देणारे असे नियम तयार झाले;  आणि आता टी-२० या खेळ प्रकारामुळे तर या गर्लफ्रेन्डचे लाड आणखी वाढले. खेळाचा साचा आणि ढाचा कॉम्प्रेस होत गेला. खेळाचे स्वरूप नॅनो वरून मायक्रो-नॅनो कडे झुकले. चार वर्षातुन एकदा येणारा वर्ल्ड कप, टी-२० च्या बहाण्याने वर्षातून दोन वेळा हजेरी लावू लागला.


खेळाचा प्रकार कोणताही असो, कौशल्य आणि मनोरंजन या दोन गोष्टींची सांगड जुळुन आली, की त्याला चांगला ‘प्रेक्षकवर्ग मिळतो. कसोटी क्रिकेटचा एक दर्दी चाहता वर्ग आहे, त्याला गोलंदाज आणि फलंदाज या  दोघांचा कौशल्यपूर्ण खेळ बघायचा असतो; तर टी-२० ची रॅप, जॅझ ही धुन कौशल्यपूर्ण मनोरंजन या प्रकारात मोडत असल्यामुळे प्रत्येकाला ती आपलीशी वाटते. आता त्याच टी-२०चा वर्ल्ड कप तयार आहे आपला जलवा दाखवण्यासाठी.

सर्व बाजुंचा विचार केला तर, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड, लंका, सा. आफ्रिका हेच संघ बाकीच्यांना बाजुला सारुन वर्ल्ड कप उचलण्यासाठीचे तगडे दावेदार दिसतात. कारण, ह्याच संघांकडे या फॉर्मटसाठी लागणारे सर्व उपयुक्त मटेरियल मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. आता, भारताचा संघ या स्पर्धेत कुठपर्यंत मजल मारणार? हा जिव्हाळ्याचा प्रश्न! २००७ च्या आठवणी काढत, तोच जलवा टीम परत दाखवेल, अशी भाबडी आशा आम्हा सर्व क्रिकेटप्रेमींना आहे, ती तशी प्रत्येक वेळी असते म्हणा. पण, यंदाही मागच्या वेळेप्रमाणेच गणित जुळणं किंवा जुळवून आणणं जरा अवघड दिसतंय. कारणं स्पष्ट आणि नेहमी सारखीच आहेत. भक्कम बॅटिंग, जी दर वेळी मोक्याच्या क्षणी भरकटते, इथे काही वेगळा उजेड पाडेल याची शाश्वती कमी आहे . बरं, विराट आणि धोनी हे काही सुपरमॅन नाहियेत, प्रत्येक वेळी मॅच जिंकुन द्यायला. बॉलिंग…, आता कशाला तोंड उघडायचं; सगळ्यांनी तोंडसुख घेऊन झालं आहे. दर वेळी आपलं “नया है वह “ असं म्हणून वेळ मारून न्यायची. फिल्डिंग; ठिक-ठाक. पण, तीही दोलायमान. कधी अप्रतिम, तर कधी टुकार फिल्डरला लाजवेल अशी. हं, आता स्पर्धा उपखंडात आहे म्हणून स्पिन बॉलिंगच्या आधारे, आणि फ्लॅट-ट्रॅक बॅटिंगच्या सहाय्याने अंधुकशी आशा ठेवता येईल.

“दुनिया बदलेगी एक ओवरमें,” असं म्हणत चॅनेलवाल्यांनी माहोल आधीच तयार केला आहे. त्यात, मॅचेस संध्याकाळी असल्यामुळे क्रिकेटप्रेमींना खोटं बोलुन ऑफिस, कॉलेजला दांड्या मारण्याची फारशी गरज नाही. भरीला सोशल मिडिया आहेच, आपल्या उचंबळलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी. “शेवटची ओवर त्याला द्यायला नको होती रे, हा शॉट खेळायची गरज होती का?”, ते “याला का घेतात रे टिम मधे?, धोनी, नाद करायचा नाही कोणी” या ट्विटस सोबत फेसबुक, वॉट्स-अप यांचे पेजेस मॅच नंतरच्या कौतुकसोहळा, तीव्र भावना, आणि शिव्या यांनी ओतप्रोत भरतील. बरं, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड ते इंडिया, वेस्ट-इंडिज पर्यंतच्या सर्व समर्थकांना ‘आपलीच टीम जिंकणार’ असा दृढ विश्वास आहे. आता, हा विश्वास कोण सार्थ ठरवतो, ते ‘क्रिकेट’च ठरवेल.

Tuesday, 25 February 2014

पुन्हा आवडत्या खेळपट्टीवर

आमच्या पोरांनी चांगला खेळ केला, आम्ही टार्गेटच्या फार जवळ गेलो हो, पण….. हा 'पण'च गेल्या बर्‍याच परदेश दौर्‍यांपासून भारताला चिकटून आहे, फेविकॉल पेक्षा जास्त चिवट. आता कारणमीमांसा केली तर, अतंर्गत गोष्टीच जास्त प्रकर्षाने पुढे येताहेत. आणि आता या संघाच्या अंतर्गत गोष्टी कॅप्टन आणि कोच यांनाच सोडवाव्या लागतील.

टीम चांगल्या स्थितीत ठेवून तिला पुढे घेऊन जाणे आणि त्यासाठी त्यातील शिलेदार निवडणे हा कर्णधाराचा हक्क असतो, जेणेकरुन एक चांगला समतोल साधला जाईल. मान्य, पण काही खेळाडुंना पर्यायच नाही आणि तेच सर्वोत्तम, अशा भ्रमात धोनीसाहेब आहेत किंवा तसं दाखवत तरी आहेत. याच भ्रमाचा फायदा घेऊन, भारतीय संघातील नाजूक कळ इतर संघ दाबत आहेत, आणि त्याचा अनावश्यक भार दोन प्रमुख खेळाडू, कोहली आणि स्वतः कॅप्टनसाहेब यांच्यावर पडतोय. एक मध्यमगती अष्टपैलु खेळाडू विदेशी पिचवर हवा आहे हे उमजतंय, पण तो खेळाडू उपलब्ध असूनही त्याचा वापर केला जात नाही, किंवा तो अस्पृश्य असल्यासारखा संघाच्या बाहेर ठेवला जातो. असंच धोरण राहिलं तर ही परवड अशीच चालू राहील.

गोलंदाज चेंडू टाकेल, तो खेळपट्टीवर पडेल, फलंदाज चूक करेल, आणि आपल्याला विकेट मिळेल... असं पक्कं गणित आपल्या कॅप्टनच्या मनात बसलंय! आपले गोलंदाज आणि हाताशी असलेले खेळाडू, यांना योग्य ठिकाणी पेरून विकेट खेचाव्या लागतात, हे धोनी विसरलाय, किंवा टेस्ट क्रिकेट मध्ये त्याला जास्त रुची नाही, असं दिसतंय. गांगुलीने अगदी समर्पकपणे याचे वर्णन एका वाक्यात केले आहे, "सध्याची धोनीची कॅप्टनशीप ही ओंगळवाणी आहे."

आता एशिया कप! आपल्या घरच्याच मातीत. सुंदर अशा निर्जिव, मंद खेळपट्टीवर. जडेजा, रोहित शर्मा, अश्विन या आपल्या धुरंधर, विक्रमी खेळाडूंना पुन्हा स्फुरण चढेल. पुन्हा धावांच्या मोठ्या थप्पी रचल्या जातील, तीनशे काय आणि साडेतीनशे काय! भारत आणि पकिस्तान सामना हे स्पर्धेचे (नेहमीप्रमाणे) प्रमुख आकर्षण ठरणार. बिचारे गोलंदाज! काही सन्माननीय अपवाद वगळले तर, ओव्हरला सहापेक्षा कमी धावा देऊन आपला कोटा कसा संपेल, या चिंतेतच गोलंदाजी करतील. सोबत विकेट मिळाली, तर बोनस मिळाल्याचा आनंद. थोड्याफार फरकाने सर्व एशियन टीम्सचा हाच चेहरा आहे म्हणा. ते म्हणतात ना, अं…. हा!!, "फ्लॅट ट्रॅक बुलीज, घरच्या मैदानावर शिंगे फुटलेले बैल."

Sunday, 23 February 2014

Back to the dusty track

Our team played good cricket, we came close, but….. This 'but' has played a big and consistent role in India’s poor performance in the last four away tours. And yet, we are not able to bridge this gap between defeat and victory. There are some micro and macro factors which are contributing to this debacle, the micro factors being more important. And at this level, Dhoni and Fletcher have big roles to play.


Captain always stays at helm and drives his team. So obviously the rights of selection are very much reserved for him. He demands or induces players which he thinks could strike a right balance. But the real fact is that Dhoni is investing in few players with false notion. He is relying too much on his intuition in decision making, including the team combination. Our current batting line-up, in ODI's and Test as well, has the fragility that has been getting exposed by opposition. Also, vacuum created by this fragility is putting too much burden on Kohli and Dhoni himself to salvage the situation. On greenish pitch away from home, team needs a pace-bowling all-rounder, he knows that. But despite having such player in service, he does not give enough chances to him.

Dhoni expects things to get in their place by chance, always. And more often he shows undue reluctance to be creative for diverting adverse situation in to propitious one. All these things are leading to slump in India’s overseas performance. It is getting like ‘India’s performance overseas is inversely proportional to the performance at sweet home.’ Saurabh Ganguly has rightly expressed about Dhoni’s captain-ship, "It's obnoxious!"

Now we are back to our own den ready for Asia cup. We will again cherish those flat, dusty, super-dead pitches. Players like Jadeja, Ashwin, Rohit Sharma would be on track, ready to give that extraordinary performance!  Bowlers, excluding one or two exceptions, would look to finish their quota with less than six runs per over, with wickets as complementary gift. More or less, all the Asian teams are molded in the same theory though. The brand of their own style typically termed as flat pitch bullies!

Sunday, 15 December 2013

Team India, believe!


The twelfth month, the last of the year and the month of rewinding the past memories, will commence and end with the African safari. In the last eleven months, we have won many battles and wars too. But most of the battles were fought on the home soil. “Apni gali me kutta bhi sher hota hai”, we have heard it so many times in the cricketing fraternity, especially in deshi discussion.  Now the onus lies with the young, high performing players to erase it with the same high profile performance on the pitch of Africans. Yes! The pitch, the razor sharp, green top, with abundant amount of bounce. And how much difficult it is to play on it can be elaborated with the two figures- 102 and 57 all out, in Durban, 1997, and the 4-0 defeat in ODI, year 2006.
The juggle and struggle

Poking out side the off stump, playing across the stumps, driving away from the body, these are the common and blessed (!) stroking habits of Indian players. Vacant mid-wicket region and open mid-off area add to the temptation of playing these strokes. The more danger is, the lion-alike bowlers in the form of Steyn, Morkel, and Philander supported by the sharp, and friendly 22-yard strip will make the job tougher. Consequently, the result could get described like this, edge… and taken in the slip, inside edge on to the stump, plum in front. Apart from it, the barrage of whirling bouncers will serve as complementary gift!



We have already seen in the just concluded one-day series, how our new lads struggled and juggled to face the Steyns, the Morkels. Considering that the test matches would be more hostile, and the host has cunningly planned it on pace tracks- the Wanderers and Durban. Thank god! Zaheer is in the team, at least for the test series. Hope, he along with Umesh Yadav and new swing Shami Ahmed, will form the formidable pace attack and give a neck to neck fight to S. African speed guns.


“It’s not about the runs, but how you run the game is important.” That is what Dhoni expressed while advertising for star sports. Now we can only say and hope, “Team India, believe!”

Thursday, 21 November 2013

Ashes down under



Some cricket lovers say we go to ground to watch Sachin play. Those seeking entertainment say we go to watch Gayle, Pollard in T-20. Those who like a chasing game prefer India-Australia contest, especially on Jaipur and Nagpur pitch. But those who love to listen Richie Benaud, Ian Chappel, Michael Holding explaining every minute details of the game, those who cherish the red cherry whistling past the batsman’s ear, those who love to see the batsmen being intimidated by the bowlers, adore the ashes; the clash between the two classical test teams.


                 
The urn, the coveted trophy, the pride, the Ashes… Australians are deprived to own this prestigious title from the last two years. Frustration, agony, torment, whatever you call it; every Australian player and Australian fans have been engrossed by these terms. They are asking for how long they would get iluded by the ashes? They are asking why the once champion and ruthless team is even begging to catch-up with England? They are questioning  isn’t our bowling strength not lethal enough to shear through England’s batting line-up twice? They are pleading can’t our batting line-up endure strongly against the England attack. They are demanding this time Cook and his troops not be allowed to fly back with the ashes.



As the reciprocal series is being played down under, cricket lovers expect Clarke and his men to show some resilience and be ardent in their efforts to pull back the ashes. Though Clarke has said his team has left behind the scar of ashes loss, that too three in a row, it would demand a high yield strength to fortify his side against the force of vivid England team. It will be a fascinating tussle to watch whether the vulnerable Australian team shows the spirit of phoenix, or the England team again burns the Aussies to ashes.

The hostile spell of Johnson and the uncharacteristic sledging attack by Clarke in the  first test has already spiced up the series. Now task is on England's hand to negate the blow by the super performance with the attitude-
"You hit me once, I hit you back,
you hit me back, I kick your ass."

Ritesh Kadam,
7775924549



































Sunday, 10 November 2013

Oh my God! Oh my God!




Finally, the day has arrived , I will be no longer seen on the cricket ground as a player. That's how Sachin announced his "ceasefire" against bowlers. Now where to find that straight-drive whistling past the stumps, flick shot from the middle stump, that square cut saying "hi" to the point fielder before reaching to the fence, that transfer of weight on back foot and drive through the covers, dancing down the wicket to spinners and the hit between long-on and long-off, that sweep against -the -spin to leg-spinner.

The last walk

 The day on which you announced your walk, newspaper, media, social media flooded with "Sachin...Sachin".We were in a nebulous state what to write anything else. Your each century, half-century, can be retrieved by the Sachinist on the spot . For the Sachinist you were cricket, they thronged in thousands only to watch you, and as you would be retiring that number would drastically come down. You have such an influence on cricket-lovers that they know each and every aspect of your game, your records, batting, crucial innings. Even those who are weak in mathematics ,remember your test match, ODI, T-20 average up to two decimal. I have even read on FB that a crazy guy put his home on deposit to purchase a ticket of your last test-match! It shows how much devotees adored you.

 In front of these crazies we see ourselves at the bottom of the knowledge pyramid ;However, as a devoted cricket-lover, and affection having for you prompted us to write few sentences about the cricketing-wonder called "Sachin."
"karmanye wa dhikaraste ma phaleshu kadachan" keeping this in mind Sachin kept playing for 23 years and amassed loads of records in all formats. Sachin and records were used to each other. From spin magicians like John Emburey to Shane Warne, then Muralidharan to Saqlain Mushtaq, and along with intimidating Merve Hughes, Mcgrath, Donald, Akram to Steyn, Brett Lee all these bowlers understood what is meant by batting only after bowling to Sachin.
The legendary Bacchhan had a dialogue" hum jahape khade hote hai, line wahise shuru hoti hai", with all your reputation you created " hum jahape khade hote hai, cricket wahise shuru hota hai". You have been known with different terms like God, magician, masiha, the recent being Superman. Every great player is remembered for his remarkable performance- Sir Viv for his innings in the final of WC-79, Botham for the 81-Ashes series. Kapil for his heroic-175 in the 83-WC. Akram's magical spell against England in the 92-WC. Warne's superb ball of the century. But your career itself is exemplary and remarkable performance. Match saving century against England, 1990, century against Australia on the fastest wicket on the earth, WACA, Perth, those two incredible Sharjah storms, that fire-against-fire in the WC-2003, against archrival Pak, and so on... If we keep counting, it will become an encyclopedia. The vivid career, the vivid records...


But every achievement or in that sense shiny career posses dark pages. And you had that impeding phase that contained match-fixing rows, allegations that you play for records, your comparison with Lara and Steve Waugh in the sense of match-winning ability in test matches. Some morally impure players himself even doubted your integrity. But amidst all this, you kept mum, and unfortunately for them you stayed diligent and answered everytime with another century, another record, and another win. The same critic then showered the praise like- "We have seen the God who plays at no 4 for India", Sachin gave me nightmare, I would like to become Sachin etc...
"Sachin" the name itself suggest the purity. Throughout your career you remained pure in your every aspect. Pure play, pure behavior, pure character, pure attitude, pure class. We never observed any extreme reaction, no abusive words like BC, MC after completion of any milestone. You were never involved in any controversy, conflict with the players, non-disciplinary action, that is why people have depicted you as divine God. If the bhagvadgeeta were replaced by your records, people would hesitate to lie. Now that you will be playing your last cricketing innings on Wankhede ground, where you spend your early playing days, devoted cricket lovers would throng the ground to cheer your every move, the stadium shall have only one sweet noise "Sachin...Sachin..." and  in the end they will leave the ground with emotions and tears. Whenever the next generation watch, read, hear about your exemplary career, there will be only one reaction, Oh my god! oh my God!"

That's it!
Note:- It was an honest effort to express my gratitude towards the legend. If anything has remained, pardon me.

Ritesh Kadam
7775924549

Wednesday, 6 November 2013

ओ माय गॉड, ओ माय गॉड!


अखेर तो नको असलेला दिवस आलाच. १९८९ साली घेतलेलं शिव-धनुष्य सचिननं आज खाली ठेवलं. तू परत बॅट उचलणार नाहीस, परत मैदानावर येणार नाहीस, तू मैदानावर येताना आणि जातानासुद्धा वाजणार्‍या टाळ्या  आता निस्तब्ध होतील. तो स्ट्रेट ड्राइव्ह, तो कट, तो अप्पर कट, तो मिडल स्टम्पवरच्या चेंडूचा लेग-ग्लान्स, डान्सिंग डाउन द विकेट आणि स्पिनरला मारलेला सिक्स, वेट बॅकफूट वर ट्रान्सफर करुन मारलेला कवर ड्राइव्ह हे सगळं आता कुठे शोधायचं...?

तू रिटायर होणार, हे कळल्यावर तुझ्या विषयी रकानेच्या रकाने भरून आले आणि अजूनही चालूच आहेत. मग आम्ही पामर आणखी काय लिहीणार? तुझी प्रत्येक सेन्च्युरी, हाफ-सेन्च्युरी तेंडुलकर-वेड्यांना तोंड पाठ आहे. कुणी तुला देव, कुणी जादुगार, कुणी मसिहा, कुणी कलाकार, कुणी सुपरमॅन, तर कुणी गळ्यातला ताईत अशा अनेक उपमा दिल्या. कुणी तुझ्यासाठी आणि फक्‍त तुझ्यासाठी क्रिकेट बघत होतं, आता तू रिटायर होणार म्हटल्यावर तेच वेडे क्रिकेट बघणं बंद करणार आहेत म्हणे. फेसबुकवर तर मी असं वाचलं की, तुझ्या शेवटच्या मॅचचं तिकिट मिळवण्यासाठी कुणीतरी घर गहाण ठेवलं! गौतम नावाच्या सचिनवेड्यानं तर पूर्ण आयुष्यच तुझ्यासाठी वाहून घेतलं. इतकी क्रेझ तू लोकांच्यात निर्माण केलीस. याला सचिनची बॅटिंग तीन दिवस रोज सकाळ-संध्याकाळ दाखवा, ताप उतरेल, एवढंच म्हणायचं राहिलं होतं.

गणित कच्चं असलेल्या लोकांनासुद्धा तुझ्या टेस्ट, वन-डे, ट्वेंटी-ट्वेंटीची सरासरी दोन डेसिमलपर्यंत पाठ आहे. तुझ्याविषयी लोकांना इतकं माहित आहे की त्यांच्यासमोर आम्ही ढ, अडाणी भासतो. मग तुझ्याविषयी आणखी काय सांगणार? पण आमच्यातला क्रिकेट-किडा, आणि तुझ्याविषयीचं प्रेम आम्हाला स्वस्थ बसू देत नव्हतं. आणि तुझ्याबद्दल लिहायचं म्हणजे थोडी तयारी करायला पाहिजे, 'उचलली लेखणी लावली कागदाला' असं थोडीच चालणार होतं. तशी आमची स्मरणशक्ती जरा कमीच आहे पण, क्रिकेटविषयी जे काही आम्हाला तोडकं-मोडकं ज्ञान होतं ते वापरून, आणि तुझ्या कारकिर्दीचा आढावा घेऊन थोडंफार लिहिलं आहे.

जसा कृष्ण अर्जुनाचा सारथी, गुरु, सल्लागार होता, तसाच, क्रिकेट हाच सचिनचा सारथी, गुरु, सल्लागार होता. 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन'… याच उक्तिप्रमाणे सचिन इतकी वर्षं खेळत राहिला. २३ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक विक्रमांच्या थप्पी त्यानं रचल्या. कुठलंही रेकॉर्ड काढा, सचिनचं नाव त्यावर आहेच. सचिनला रेकॉर्डची आणि रेकॉर्डला  सचिनची सवयच होती. १९९०च्या दरम्यानचे जॉन ऐम्बुरी ते शेन वॉर्न आणि पुढे मुरलिधरन, सकलेन मुश्ताकपर्यंत, सोबतच मर्व हुजेस, मॅग्राथ, डोनाल्ड, अक्रम ते स्टेन, ब्रेट ली पर्यंत सर्वांना सचिननं बॅटिंग म्हणजे काय, याचं प्रॅक्टीकल वेळोवेळी दाखवून दिलं होतं.

'हम जहाँपे खडे होते हैं, लाइन वहींसे शुरु होती है', असा बच्चनचा एक डायलॉग आहे, त्याप्रमाणे, 'हम जहाँपे खडे होते हैं, क्रिकेट वहींसे शुरु होता है', हा पायंडा तू पाडलास. तुला चौपाटीवर भेळ खायला जायचं म्हटलं तरी तिथल्या सुरक्षा यंत्रणेवर ताण यायचा, इतकी लोकप्रियता तू मिळवलीस.

पुन्हा येणे नाही....


अनेक खेळाडू त्यांच्या अविश्वसनीय कामगिरीसाठी ओळखले जातात. सर विव्ह रिचर्डस, त्यांच्या १९७९च्या वर्ल्ड-कप फायनलमधील सेन्चुरीसाठी, बोथम त्याच्या १९८१च्या 'बोथम सीरिज'साठी, कपिल देवच्या १९८३ मधील १७५ धावा, वसिम अक्रमचा तो १९९२ वर्ल्ड-कप मधील मॅजिक स्पेल, वॉर्नने गॅटिंगला टाकलेला सुपर्ब-बॉल... पण, तुझ्या अशा अनेक खेळी आहेत, किती म्हणून सांगाव्यात. करियरच्या सुरुवातीलाच इंग्लंडविरुद्ध शतक ठोकून वाचवलेली टेस्ट मॅच, अब्दुल कादिर या महान लेग-स्पिनरला मारलेल्या सिक्स, पर्थच्या अतिशय फास्ट पिचवर ह्युजेस, ब्रुस रीड, व्हिटने यांच्याविरुद्धची शतकी खेळी, त्यानंतर मग चालूच होतं, ऑस्ट्रेलियाविरुद्ध शारजाहमधील वादळ, चेन्नईमधे पाक, परत २००३च्या वर्ल्ड-कपमध्ये पाक, २००७-०८ मधील सिडने… असं मोजत गेलो तर एनसायक्लोपिडीया तयार होईल!

प्रत्येक झळाळत्या गोष्टीला काळी किनार असते. तू ही त्याला अपवाद नव्हतास. १९९७ हे तसंच एक काळं वर्ष. मॅच फिक्सिंगचा ससेमिरा भारतीय टीम, आणि कॅप्टन या नात्यानं तुझ्यामागे लागला होता. त्यानंतरही कसोटी मॅच जिंकून देण्याच्या तुझ्या ताकदीविषयी तुझ्यावर टीका होत राहिली. परत, तू ग्रेट की लारा, वॉची खेळी चांगली की तुझी, इथपासून ते तू रेकॉर्डसाठी जास्त खेळतोस इथपर्यंत उहापोह झाले. ज्यांनी आयुष्यभर बेशिस्तपणा दाखवला, अप्रामाणिकपणाचा कळस केला त्यांनी तुझ्या खरेपणाविषयी शंका घेतल्या. पण, या सर्व गोष्टींना तुझं एकच उत्तर असायचं - परत एक शतकी खेळी, परत एक विक्रम, परत एक मालिका-विजय! मग हेच टीकाकार तुझी गोड-गोड स्तुती करायचे, कसे? - 'मी देव पाहिलाय, तो भारतासाठी चार नंबरवर खेळतो', 'सचिन माझ्या स्वप्‍नात येतो', 'पुढल्या जन्मी मला सचिन होणे आवडेल' वगैरे, वगैरे…

क्रिकेटनं तुला भरभरून दिलं, तू आम्हाला भरभरून दिलंस, त्या बदल्यात परत क्रिकेटप्रेमींनी तुला भरभरून प्रेम दिलं. फक्‍त क्रिकेटर म्हणून नाही तर, एक सुसंस्कृत क्रिकेटर म्हणून तू स्वतःची ओळख निर्माण केलीस. स्वतःच्या नावाप्रमाणेच तू प्रत्येक बाबतीत 'प्युअर', शुद्ध राहिलास. प्युअर खेळ, प्युअर दृष्टीकोन, प्युअर-क्लास, प्युअर वागणं, प्युअर चारित्र्य. लोकांनी भले तुला मोठं केलं असेल, देवपण दिलं असेल पण तुझ्या वागण्यात कधी 'ऍटीट्युड' नाही आला. शतक पूर्ण केल्यावर बीसी, एमसी हे शब्द कधी तुझ्या तोंडून नाही आले. ज्या क्रिकेटनं तुला सर्व काही दिलं, त्या क्रिकेटला धक्का पोहचेल असं तू कधीच वागला नाहीस. बारमधील मारामारी, पिचवरील लघुशंका, संघातील खेळाडुंसोबतचे तंटे, मॅच रेफरीकडून दंड, बेशिस्तपणासाठी निलंबन या गोष्टींपासून तर तू चार, नव्हे चांगले दहा-बारा हात लांब होतास, म्हणूनच तर लोकांनी तुला देवपण बहाल केलं. कोर्टात भगवद्‍गीतेऐवजी तुझ्या रेकॉर्डवर हात ठेवून जर खरं बोलायला सांगितलं तर लोक जास्त खरं बोलतील. आता तू शेवटचं खेळतो आहेस, त्याच वानखेडेवर जिथं क्रिकेटची सुरुवात केलीस. पूर्ण पाच दिवस स्टेडियम खचाखच भरलेलं असेल आणि सर्वांत शेवटी सगळेजण एकच भावना व्यक्‍त करतील, "आर-पार काळजात का दिलास घाव तू...?" पुढच्या पिढ्या जेव्हा तुझ्या कारकिर्दीचा आढावा घेतील तेव्हा त्यांच्या तोंडून एकच वाक्य निघेल, "ओ माय गॉड, ओ माय गॉड...!"

शेवटी कोल्हापुरी शैलीत एकच वाक्य म्हणेन, "भावा, जिंकलंस तू…"


शेवटची खेळी...


(टिपः- सचिनविषयी जे काही मला माहित होतं, ते लिहिण्याचा एक प्रयत्‍न केला आहे. चूक झाली असेल, किंवा काही राहिलं असेल तर, सचिनप्रेमींनी माफ करावं.)

रितेश कदम
7775924549