Thursday 4 December 2014

The Hot Test!


First of all a tribute to Philip Hughes.

We are on a dangerous territory named Australia. This territory is abundant with wild and poisonous creatures. viz.-Crocodiles, red-back spiders, sharks in the jungle. And deadly Johnson, Pattinson, Siddle, Starc, Harris on the cricket field. These fiery and aggressive species spit venoms of bouncers, have sharp teeth of in and out cutters, and sting of sledging. Our not-so-experienced chaps would be surrounded by these wild and poisonous creatures, on the cricket field. When we retrospect/look back, it is evident that Australian team does not let the visiting team breath easily. Their fiery fast bowlers keep attacking relentlessly with the intent of making thrust in the batting order. In the last Ashes series, we have witnessed vandalism of England team by that fear factor, especially by Johnson's juggernaut.
On the Australian soil our sole best performance in the test, where we squared the series 1-1, was in the year 2004. We had successfully confronted the mighty Australian team, led by Steve Waugh, mainly due to fab-four's magnificant batting display under Ganguly's leadership. Sweet, but that is the past. We have also experienced bitter taste down under in the disastrous series of 2011. Sadly, since then our performance in test matches abroad has descended from worse to worst.
Our sustainability in the longer version of the game is already under scanner. Pujara, Kohli, Dhawan, all have failed miserably in the recently concluded series in England. The recent performance of our top order batsmen indicates that they have been under the phobia of pace bowling and dark green wicket. How could Australia let go this ideal scenario! They would be desperate and in attacking stance for the vengeance of the last series played in India, which they unexpectedly lost by 4-0. Glenn Macgrath and Siddle have already ignited the war of words by predicting India's whitewash.
But, if India manage their resources and energy with some cunning ploy, they could show a better performance. On Gaba, Brisbane, known for its green wicket and uncertain weather, pace battery of Varoon Aaroon, Umesh and Ishant can be utilised with optimum effect. On Adelaide and Sydney, which show some affinity for spinners, our inherant weapon, spin bowling may give us some hope. One thing India has to keep in mind,
under any circumstances 'attacking strategy' is the best option against Australia in Australia . But the question is- how Dhoni will handle the procedings? If he continues with his stale and defensive tactics.














द हॉट टेस्ट!

प्रथम ऑस्ट्रेलियाच्या फिलिप ह्युजेसला भावपूर्ण श्रद्धांजली!

ऑस्ट्रेलिया - तसा हिंसक पशूंसाठी फार प्रसिद्ध. मोठ्याल्या मगरी, विषारी कोळी, अरे हो, शार्कसुद्धा. ह्या सगळ्याच आक्रमक प्रजाती.. बहुदा यांचेच गुण ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सनी उचललेत. जॉन्सन, पॅटिन्सन, स्टार्क, सिडल, हॅरिस हे सगळेच धष्टपुष्ट आणि ताडामाडासारखे उंच बॉलर्स. तुफानी स्पीड, १४५ च्या वर. घाबरवण्यासाठी बाउंसर, आणि सोबत स्लेजिंगचा (शिव्या देण्यासाठी वापरलेले गोंडस नाव) भडिमार. आता यांच्यासमोर आपले, नुकतेच इंग्लंड दौर्‍यातून शरणागती पत्करून आलेले, वीर रडणार...सॉरी, लढणार आहेत. मागच्या भारत दौर्‍यात ऑस्ट्रेलियाने ४-० असा अनपेक्षित मार खाल्ला होता. त्यामुळे त्या पराभवाची जखम भरून काढण्यासाठी त्यांची फौज नक्कीच आसुसलेली असणार.

आता ऑस्ट्रेलियाला गेल्यावर तिथे काही आपलं टिळा लावुन स्वागत होत नाही. तिथं विमान लँड व्हायचा अवकाश, की लगेच टक्के-टोणपे चालू होतात. दौरा सुरू होण्याआधीच प्रतिस्पर्धी संघाला कसं घाबरवायचं याचा प्लॅन तयार असतो. त्यासाठी एक वेगळं डिपार्टमेंटच असतं. "तयार रहा, भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून ४-० ने मार खाणार," वेल-कम टू ऑस्ट्रेलिया. इति ग्लेन मॅग्राथ. सिडलनेही कोहलीला प्रेक्षकांचे भय दाखवले आहे. बाकिची कसर मिडियावाले भरून काढतात किंवा काढतील.

ऑस्ट्रेलियासाठी निम्मे काम तर त्यांचे बॉलर्सच करतात. ते प्रतिस्पर्ध्याला कधीच जम बसवू देत नाहीत. मागच्या ऍशेस सिरिजमधे इंग्लंड टीमच्या अनेक खेळाडूंना जॉन्सनच्या बाउंसर्सने शेकून काढले होते. त्यातच आपला इंग्लंड दौर्‍याचा अनुभव ताजा आहेच. कोहली, पुजारा, धवन यासकट सर्वच खेळाडूंना आपली ऑफ-स्टंप नक्की कुठे आहे, हे समजण्यातच दौरा संपला. सध्या आपल्या खेळाडूंची विकेट बॉलर्सपेक्षा धसक्यानेच जास्त जाते. ते पुर्वी होतं ना, मुघलांच्या घोडयांना संताजी आणि धनाजी हे पाण्यातही दिसायचे. आणि त्या पाण्यालाही ते जसे घाबरत होते, तशीच अवस्था काही प्रमाणात भारतीय फलंदाजांची झाली आहे. खेळपट्टीवर हिरवळ, आणि फास्ट स्विंग होत असलेला बॉल पाहिला की भारतीय फलंदाज बिथरतात. तीच गत या दौर्‍यातही राहिली तर हा दौरासुद्धा, डोक्यापासून टाचेपर्यंत, कठीण आहे!

मग पर्याय काय, जर मालिकेत चांगलं प्रदर्शन करावयाचे असेल तर? थोडे मेंदूला कष्ट द्यावे लागणार आणि अभ्यास करावा लागणार. दोन सामने आहेत अनुक्रमे ब्रिस्बेन आणि मेलबर्नवर, फास्ट बॉलर्सशी सलगी करणारे पिच. आपल्याकडे वरून आरून, इशांत, आणि उमेश यादव यांच्यासारखे फास्ट बॉलर्स आहेत. जर ब्रिस्बेनवर चार फास्ट बॉलर्स खेळवून थोडी आक्रमकता दाखवली आणि तो सामना अनिर्णित राखता आला, तर त्याचा फायदा ऍडलेड आणि सिडनेवर होईल. कारण, एक तर इथल्या विकेट्स स्पिन बॉलर्सना थोडी 'लाईन' देतात, आणि इतर ठिकाणांपेक्षा आपली इथली कामगिरी तुलनात्मकदृष्टया चांगली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी करायची असेल, तर आक्रमक डावपेच हाच सर्वोत्तम उपाय आहे. जरासा ढिलेपणा दाखवला आणि अतिबचावात्मक पवित्रा घेतला तर जो काही 'डिफरन्स' राहतो, त्याचाच उपयोग ऑस्ट्रेलिया मॅच जिंकण्यासाठी करतो. आणि हाच 'डिफरन्स' गेल्या कित्येक मालिकेत आपल्याला 'लई भारी' पडलेला आहे. त्यामुळे धोनी कशी रणनीती आखतो आणि त्याची अंमलबजावणी करतो, यावरच मालिकेतील यश (किंवा 'पराभवाची' तीव्रता) अवलंबून असेल!

Friday 7 November 2014

प्लेइंग इट माय वे, कॉन्ट्रावर्शियली!

राजकारण आणि स्पोर्ट्स, ही दोन अशी क्षेत्रं आहेत जिथं 'कॉन्ट्रावर्सी' हा अविभाज्य घटक असतो. तिथं कॉन्ट्रावर्सी नसणं हीच मोठी कॉन्ट्रावर्सी असू शकते. सध्या अशीच एक 'कॉन्ट्रावर्सी' गाजतेय क्रिकेटमधे, सचिनच्या आत्मचरित्रावरून. सचिन नावाच्या महापराक्रमी योद्ध्यानं क्रिकेट कारकीर्दीमधले आपले अनुभव - बरे आणि वाईट, स्वतःच्या आत्मचरित्रात उतरवले. सचिनची क्रिकेटमधील तेवीस वर्षांची कारकीर्द, तीही भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात! त्यामुळं त्याचं आत्मचरित्र हे त्याच्या बॅटिंगसारखंच खणखणीत असणार, यात काही शंका नव्हती. पण वादविवादापासून नेहमीच दूर राहणार्‍या सचिननं ग्रेग चॅपल नावाचं एक 'वादग्रस्त चॅप्टर' त्यात टाकून वादळ निर्माण केलं. या चॅप्टरमधे चॅपलचा 'चाप्टरपणा', त्याची फुटीरतावादी वर्तणुक, आणि त्याची कार्यशैली कशी संशयी होती, हे सचिननं स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. अनेकांना हे खटकलं. पण सचिन काही पहिला खेळाडू नाही ज्यानं आपल्या पुस्तकात कटू, पण सत्य अनुभव कथन केले आहेत. हसी, इम्रान खान, स्टीव्ह वॉ, शेन वॉर्न, आणि झालंच तर शोएब अख्तर, पिटर्सन या सर्वांनीच या ना त्या प्रकारे असे अनुभव मांडले आहेत. बरं, सचिननं जर एखादा अनुभव सांगितला असेल आणि तोही पुस्तकाद्वारे, तर त्याच्या क्रेडिबिलिटीवर शंका घेण्याचं काहीच कारण नाही. त्याच्या शॉटप्रमाणेच त्याचे विचारही 'क्लिन' असतात. भले ग्रेग चॅपलनं या आरोपांचा साळसूदपणे इन्कार केला असेल, पण चॅपेल किती विश्वासार्ह आणि (अव)गुणी आहे, हे ऑस्ट्रेलियासकट सर्वांना माहित आहेच!

काहींनी शंका उपस्थित केली की, हा वाद-प्रपंच आत्ताच का? या गोष्टी आधी का नाही सांगितल्या? पुस्तक खपवायचं हे 'मार्केटिंग' आहे का? वगैरे, वगैरे. एक तर सचिनला असल्या 'चीप' मार्केटिंगची गरज नाही. दुसरं म्हणजे क्रिकेटमधे काही एटिकेट्स बाळगायचे असतात. क्रिकेट खेळत असताना अशा 'गुज-गोष्टींची' वाच्यता ड्रेसिंग-रुमच्या बाहेर करायची नसते. त्या कॉन्फिडेन्शियल गोष्टी असतात. जेवढं शक्य आहे तेवढं वादळ कपातच शांत ठेवायचं असतं. नाही तर टीम आणि खेळाडूची कारकीर्द विस्कटायला वेळ लागत नाही. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे इंग्लंडचा केविन पिटर्सन, आपला मनोज प्रभाकर, आणि सिद्धू!

क्रिकेट खेळणं हे लढाईसारखंच असतं. लढाई लढताना, जिंकताना, हरताना जितके वार केले जातात तितकेच, किंबहुना जास्तच झेलावेही लागतात. त्या जखमांच्या खाणाखुणा शरीरासोबत मनावरही उमटत असतात. सतत मैदान गाजवत असताना मनावरील या जखमा, कटू आणि वेदनादायक अनुभव खोल कुठंतरी दबून राहतात, नव्हे ते दाबून ठेवावे लागतात. पण शस्त्रं खाली ठेवल्यानंतर मनातल्या या जखमांचा भार, ते अनुभव कुठल्या ना कुठल्या माध्यमातून बाहेर येतातच! सचिननं तो भार 'प्लेइंग इट माय वे' द्वारे शब्दरुपानं पानांवर उतरवला इतकंच.

Sunday 5 October 2014

बॉलर्स; दुर्दैवाचे धनी!

स्वीप, रिव्हर्स स्वीप, स्कुप, स्वीच हिट... क्रिकेटची जस-जशी उत्क्रांती होत गेली, तस-तशी खेळाडूंनी अशी अनेक इनोव्हेशन्स केली. (क्रिकेटमधे पेटंट हा प्रकार अजून आलेला नाही. त्यामुळे अमुक एक शॉट तमुक एका खेळाडूच्या परवानगीशिवाय खेळला जाऊ शकणार नाही, हा नियम अजुनतरी लागू झालेला नाही.) बॅट्समनसाठी तशी फारशी बंधनं नाहीत. कुणीही कुठलाही शॉट क्रियेटीव्हली कसाही खेळू शकतो. इकडे बॉलर्सकडे फारसे पर्याय नाहीत. वंशपरंपरागत चालत आलेली तीच ती आउट-स्विंग, इन-स्विंग, कटर, लेग-कटर अशी आयुधे. बॉलर जर तगडा असेल तर बॅट्समनला घाबरवण्यासाठी बाउंसर नावाचा तोफगोळा. स्पिन बॉलर्सची अवस्था तर मध्यमवर्गीय कुटुंबासारखी. लेग-स्पिनर असेल तर लेग-स्पिन, गुगली, फार-फार तर फ्लिपर. ऑफ-स्पिनर त्याहीपेक्षा मर्यादीत, बॅट्समनसाठी ती मेजवानीच असते. बिचार्‍यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो.

काही बॉलर्सनी थोडेफार इनोव्हेशन करण्याचा प्रयत्न केला. पण ते सर्व वादग्रस्तच ठरले. या इनोव्हेशनचा श्रीगणेशा केला इम्रान खान याने. रिव्हर्स-स्विंगला तिखटपणा आणण्यासाठी त्याने नखे आणि टोपणाचा वापर करुन सीम कुरतडण्याचा प्रताप केला होता. त्यामुळे बॉल कधी खाली रहायचा तर कधी झप्पकन बाउंस व्हायचा. काही महाभागांनी तर बॉलची शाइन आणि स्विंग टिकवण्यासाठी व्हॅसलीनचा वापर केला होता. ही इनोव्हेशन्स तशी बेकायदेशीरच होती. खरे इनोव्हेशन आणले ते सकलेन नामक बॉलरने. ऑफ-स्पिन बॉलिंगला नवसंजीवनी देण्यासाठी त्याने पुढाकार घेतला. नेहमीच्या ऑफ-स्पिनसोबत एक बाहेर वळणारा बॉल त्याने विकसीत केला आणि त्याला नाव दिलं 'दुसरा'. ज्या टप्प्यावरुन तो ऑफ-स्पिन टाकायचा त्याच टप्प्यावरुन बेमालुमपणे 'दुसरा' वळवायचा. 'दुसरा' हा सकलेनच्या आज्ञाधारक सेवकाप्रमाणे होता.

नवीन काही आले की लगेच त्याची कॉपी सुरु होते. 'दुसरा'पण त्याला अपवाद नव्हता. अनेकांनी या 'दुसर्‍या'साठी प्रयत्न केले. आणि इथेच परत दुर्दैव आडवे आले. या 'दुसर्‍या'पायी आय.सी.सी.चा ससेमिरा स्पिन बॉलर्सच्या मागे लागला. राजेश चौहान, हरभजन, मुरलीधरन, सम्युअल्स, शोएब मलिक, या सर्वांना बॉलिंग एक्शनसाठी बायो-मेकॅनिक्सच्या एक्स-रेमधून जावे लागले. राजेश चौहानला तर कपडे काढून तासन्‌तास नेटमधे बॉलिंग करायला लावलं होतं. मुरलीधरनला तर आयुष्यभर संशयाच्या नजरेखालीच बॉलिंग करावी लागली.

आता परत दोन गुणी बॉलर्स संशयाच्या भोवर्‍यात सापडलेत. अजमल आणि सुनिल नरायन (कुणी नरीन म्हणतं). अजमल बॉलला फ्लाईट देऊन 'दुसर्‍यामधे' बॅट्समनला अडकवतो, तर नरीनचा 'मिस्टरी बॉल' डोळ्याला दुर्बीण लावूनही ओळखता येत नाही. पण आय.सी.सी.ला हेही बघवले नाही. दोघांचीही रवानगी (बॉलिंग) सुधारगृहात करण्यात आली आहे. नियमावलीनुसार, बॉलिंग करताना हाताचा कोपरा १५ अंशापेक्षा जास्त वळता कामा नये. अजमल आणि नरीनचा हात अनुक्रमे ४० आणि २२ अंशाने वळतो. हे थोडेसे जास्त आहे. पण तरीही रमीज राजा यांच्या म्हणण्यानुसार खरे तर नियमावलीत थोडी दुरुस्ती होणे गरजेचे आहे. आधीच बॉलर्स म्हणजे रंजली गांजलेली प्रजाती आहे. त्यांच्या पदरी नेहमी अवहेलनाच आल्या आहेत. त्यांना थोडीशी तरी सवलत मिळायला हवी. बॅट्समनचाही जरा कस लागू दे. आणि तसेही क्रिकेटमधे बॉलर आणि बॅट्समनचा मुकाबला बघण्यातच मजा असते ना राव!

Sunday 7 September 2014

कॅलिस- चोविस कॅरेट हिरा

दक्षिण आफ्रिकेत दोन गोष्टींचं पीक मुबलक प्रमाणात येतं. एक, अप्रतिम हिरे आणि दुसरं म्हणजे अजोड असे ऑल-राउंडर क्रिकेटर! १९९१ साली क्रिकेट जगतात री-एंट्री झाल्यानंतर कदाचित आफ्रिकेनंच सर्वात जास्त हिर्‍यासारखे ऑल-राउंडर क्रिकेट जगताला दिले आहेत - मॅकमिलन, पोलॉक, क्लुसनर, क्रोनिए, आणि कॅलिस. पैकी कॅलिस हा पैलू पाडलेला चोविस कॅरेटचा लखलखता हिरा होता. संपूर्ण करियरमधे या हिर्‍याची चमक सतत तेजःपुंजच राहिली.

१९९५-९६ साली सोनेरी केस असलेल्या या स्टाइलिश खेळाडूनं करियरला सुरुवात केली. आफ्रिकेच्या संघाचा दबदबा त्याकाळी नुकताच चालू झाला होता. आपल्या इथं बॉलरनं जरा चांगली बॅटींग केली, की लगेच घिसाडघाई होते त्याला ऑल-राउंडरचा शिक्का मारण्यासाठी. पण जातिवंत ऑल-राउंडर होणं किंवा असणं ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. त्याला क्रिकेट देवाचा आशिर्वाद घेऊनच जन्मावं लागतं.

क्रिकेटच्या भाषेत बोलायचं झालं, तर ऑल-राउंडरमधे प्रकार दोन - बॉलिंग ऑल-राउंडर आणि बॅटिंग ऑल-राउंडर.

म्हणजे बेसिक स्किल हे बॉलिंग पण सोबत बॅटिंगही जमते, तो बॉलिंग ऑल-राउंडर. इम्रान खान, वसिम अक्रम, शॉन पोलॉक, कपिल देव, हॅडली हे बॉलिंग ऑल-राउंडर या कॅटेगरीमधले.तर दुसर्‍या प्रकारात पिंड बॅटिंगचा, पण बॉलिंग टाकता येते, तो बॅटिंग ऑल-राउंडर. हंसी क्रोनिये, स्टिव्ह वॉ, क्लाइव्ह लॉइड, रवी शास्त्री, क्लुसनर हे बॅटिंग ऑल-राउंडर या कॅटेगरीतले. पण या दोन्ही प्रकारात कुठली तरी एक बाजू दुर्लक्षित राहते.

तर या दोन्ही प्रकारामधे जे पारंगत असतात, निष्णात असतात, त्यांना बॅटलिंग ऑल-राउंडर अशी संज्ञा दिली, तर ती वावगी ठरू नये.क्रिकेट इतिहासात फार कमी प्लेयर्स या कॅटेगरीमधे सातत्य ठेवू शकले. सर गॅरी सोबर्स, बोथम, आणि कॅलिस हे या कॅटेगिरीमधले मोजके नामवंत.

क्रिकेटमधे बॉलर आणि बॅट्समन यांची सांगड घालून परफेक्ट-११ची टीम तयार करणं, हे महाकठीण काम. अशा वेळी कॅलिससारखे ऑल-राउंडर देवासारखे धावून येतात.

कॅलिस बॅटिंगच्या बाबतीत टेक्निकली एकदम परफेक्ट. फॉरवर्ड डिफेन्स, बॅकफूट ड्राइव्ह, कव्हर-ड्राइव्ह, स्ट्रेट ड्राइव्ह, फ्लिक... सर्व शॉट पुस्तकात दिल्याप्रमाणं अगदी काटेकोर. शॉट खेळताना त्याचा बॅलन्स कधीही ढळला नाही.

तसं बघितलं तर ऑल-राउंडर म्हणजे फक्त बॅटिंग-एके-बॅटिंग किंवा वाटेला आलेल्या ओव्हर टाकणे नव्हे. संघाचा तो आधार असतो. पाच किंवा सहा नंबरवर येऊन तो टीमच्या स्कोअरमधे नाही म्हटलं तरी चाळीस-पन्नासची भर घालतो. कॅलीसनं अशा बर्‍याच वेळा आफ्रिकेला संकटातून बाहेर काढलं आहे. २०११ सालची भारत-आफ्रिका टेस्ट आठवते? आपल्याकडं दीडएकशे रन्सची आघाडी होती. कॅलिस जखमी, आफ्रिका १३० वर सहा विकेट. आपण मालिका जिंकणार, हे जवळपास निश्चित! पण कॅलिस आला, मॉर्कलला सोबत घेऊन सेंन्चुरी मारली, आणि आफ्रिकेला फक्त सामन्याच्याच नव्हे तर मालिका पराभवाच्या संकाटातूनही वाचवलं. अशा अनेक संस्मरणीय खेळी कॅलिसनं खेळल्या आहेत. कॅलिस या नावाचा धाक प्रतिस्पर्धी संघात नेहमी असायचा... कॅलिसमधल्या बॉलरनंही बॅटिंगप्रमाणंच तगडा परफॉर्मन्स दिला होता. उमेदीच्या काळात १४० ते १४५ या स्पीडनं तो बॉलिंग टाकायचा. इतकंच नव्हे, तर कॅलिस हा एक उत्कृष्ट असा स्लीप-फिल्डरही होता. आपण सचिनबद्दल बोलतो, लाराबद्दल बोलतो, पाँटींगची स्तुती करतो; पण कॅलिसही त्यांच्याच तोडीचा होता. मित्रांनो, कसोटी आणि वन-डेमधे दहा हजारापेक्षा जास्त रन्स, तीनशेपर्यंत विकेट्स, आणि दोनशे कॅचेस! खरंच, कॅलिस एक लिजंड होता... किंबहुना 'चोविस कॅरेट हिरा' ही उपमाच त्याच्यासाठी योग्य ठरेल!

प्रिय विराट.......



प्रिय विराट.......
                                        
प्रिय विराट,

मित्रा कसा आहेस? काही नाही रे, म्हटलं सहज चौकशी करावी, इंग्लंडमधे 'ऑल क्लियर' आहे ना? कारण इंग्लंडमधे गेल्यापासून तू जरा 'थंड-थंड' वाटतोयस. दोन टेस्ट झाल्या, नेहमी तुझी गाडी एका 'किक'मधे स्टार्ट होते आणि सुसाट वेगात झीरो टू हन्ड्रेड क्रॉस करते; पण इथे तुझी गाडी स्टार्टच होत नाहीये. फिल्ड करतानापण बॉडी लँग्वेजही थोडी सॉफ्ट वाटतीये. ते एग्रेशन, पॅशन मंदावल्यासारखं जाणवतंय.

नाही, लोक कुजबुजतायत अनुष्का आणि तुझ्या अफेयरबद्दल. अशी चर्चा चालू आहे की, त्या नकछडीच्या सान्निध्याने तुझ्या बॅटिंगला ब्रेक लागलाय. हरी ओम!

मित्रा, थोडं सांभाळून! भले-भले खेळाडू या बॉलिवूड ग्लॅमरच्या मोहजालात कोळ्याच्या जाळ्यात अडकावे त्याप्रमाणे अलगद अडकलेत. याला विदेशी खेळाडूही अपवाद नाहीत. आणि त्याचे काय परिणाम झालेत, याविषयी तू पुरेपूर जाणतोस. सोबर्स - अंजू महेंद्रू, विव्ह रिचर्ड्स - नीना गुप्ता, रवी शास्त्री - अमृता सिंग ही रेट्रो काळातली अफेयर्स. पैकी विदेशी खेळाडूंचं राहूदे रे! त्यांची लाइफ-स्टाईलच अशी आहे - खा, प्या, खेळा, मजा करा, आणि 'सोडून' द्या. ते जास्त मनाला लावून घेत नाहीत. आपला पिंड तसा नाही राजा; आपण विचलीत होतो. अझरचंच उदाहरण घे! ९०च्या दशकात संगीता बिजलानीच्या पुंगीने अशी भुरळ घातली की, अझर स्मृतीभ्रंश झालेल्या रोग्यासारखा वाटत होता. स्क्वेयर कट आणि फ्लिक हे आपले पाळलेले शॉट आहेत हेच तो विसरला होता. लांब कशाला, युवराज - दीपिका आणि धोनी - दीपिका हा डबल-बार कसा होता! २००७ च्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात युवराजला नामी संधी होती, टेस्ट टीममधे जम बसवण्याची. धोनीनं दीपिकामधून अलगद अंग काढून घेतलं, पण युवराज मात्र दीपिकाच्या मागं फरफटत गेला आणि परत टेस्ट टीममधे कधीही जम नाही बसवू शकला. गांगुलीही नगमासोबत थोडा भरकटत होता, पण वेळीच सावरला. अशा या कथा आणि व्यथा, क्रिकेट - बॉलिवूड अफेयर्सच्या.

क्रिकेट फार अजब खेळ आहे बाबा! इथं फॉर्म आणि फुटवर्क एकदा लडबडलं की सगळंच बिघडतं. मान्य आहे तू तरुण आहेस, थोडंफार अट्रॅक्शन असणार. पण हे विसरू नकोस - तू एक धाकड, हाय-कॅलिबर आणि निडर बॅट्समन आहेस. टीमची कमान बर्‍याच अंशी तुझ्यावर अवलंबून आहे. येणार्‍या काळात इंडीयन टीमचा कॅप्टनही होशील. या तारकांचं काय, खोबरं तिकडं चांगभलं. त्यामुळं भावा, अशा प्रलोभनानं आपलं लक्ष विचलीत होऊ देवू नकोस.



जोपर्यंत स्कोअरची 'भरती' आहे तोपर्यंत ठीक आहे. पण एकदा 'ओहोटी' चालू झाली, की एक्स्पर्ट्सची करडी कठोर नजर प्रत्येक बारीक गोष्टींचा कीस काढायला तयार असते. मग तुझं मेंटल कॉन्सन्ट्रेशन कमी पडतंय, डावा पाय बॉलच्या रेषेत येत नाही, तो जरा शॉट शरीरापासून दूर खेळतोय, बॅट-पॅडमधे गॅप जास्त राहतेय; असे एक ना अनेक (भले ते नसले तरी) उणे-दुणे काढले जातात.

त्यामुळं कोल्हापुरी श्टाइलमधे सांगतो भावा, आपण भलं, आपलं क्रिकेट भलं. 'आपला एकच पक्ष, क्रिकेटवर लक्ष' एवढंच लक्षात ठेव!

"इ बारभी टेस्ट सिरीज ज़ितेकी रही..."


लॉर्डसच्या हिरव्यागार पीचवर इंग्लंडला मात दिल्यानंतर आम्हा क्रिकेटप्रेमींना स्वप्नं पडू लागली होती; आता इंग्लंडमधे आपला झेंडा फडकणार. ईशांत, शामी, वरुण आरून, भुवी, जडेजा इंग्लंड फलंदाजावर हल्लाबोल करणार. कोहली, पुजारा, विजय, रहाणे, धोणी इंग्लंड बॉलर्सचा टिच्चून सामना करणार. पण जेव्हा हे ढग, आता विजयाचा पाऊस पाडणार असे वाटत असताना हवेतच विरुन गेले, तेव्हा लगानचे काही डायलॉग आठवले - "बखतसे पहिले खुशियां..." आणि "इ बार भी टेस्ट सिरीज जितेकी रहीं."

विदेश दौर्‍यागणिक दौरे जाताहेत, अनुभवाची (पराभवाची) शिदोरी बळकट होतेय. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, पण अपयशाच्या या पायर्‍या संपता संपत नाहियेत. सिरिज संपल्यानंतर धोनीचे तेच-तेच स्पष्टीकरण - "आम्ही चांगला खेळ केला, पण आमच्या खेळाडूंना या वातावरणात खेळण्याचा अनुभव नसल्यामुळे काही (त्याच-त्याच) चुका झाल्या. या अनुभवाच्या आधारे आम्ही पुढच्यावेळी चांगली कामगिरी करू."

त्यात रवी शास्त्रीने अगदी प्रेमाने समजूत घातली. आपली पोरं अजून कोवळी आहेत, अशा वातावरणात जुळवून घेणे जरा अवघड असते, आपली ताकद वन-डे आणि २०-२० आहे. हे काय जस्टिफिकेशन आहे! (त्याचं बक्षीसही त्यांना मिळालं म्हणा.)

९४, १४८, १५२, १७८ हे आपले मागल्या कसोटीतील स्कोर आहेत.
अरे, तिकडे झिंबाब्वे दोन वेळचं मानधन कसं-बसं मिळवून डेल स्टेन, मॉर्कल यांचा सामना करीत ९० ओव्हर खेळून काढतात. आणि इथं सर्व सुख-सुविधा, बॅटिंग कोच, बॉलिंग कोच, मुख्य कोच असूनही आपल्याला पन्नास ओव्हरही खेळणं जीवावर येतं!

आजही दर्दी क्रिकेट चाहता टेस्ट क्रिकेट आवर्जून बघतो. कारण टेस्ट क्रिकेटमधेच बॉलर बॅट्समनला जाब विचारू शकतो. स्विंग आणि सीम होणार्‍या पीचवर बॅट्समनला नाचवू शकतो. याचा सामना करुन जो बॅट्समन रन्स काढतो त्या रन्सची आणि खेळीची गोडी आणि आत्मियता काही वेगळीच असते...

पण आपल्याला चटक लागली आहे, फक्त वीस-तीस ओव्हर्स खेळून पन्नास-साठ रन्स काढायची. ही सवय म्हणजे जित्याची खोड झाली आहे आता.



इंग्लड विरुद्धच्या या टेस्ट मॅचेसमधे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. पीचवर नांगर टाकून, संयम दाखवत हळूहळू रन्स जमा करायची तसदी भारतीय फलंदाजांना नकोय. बॉल कसा स्विंग होतोय, पीचवर पडल्यानंतर कुठे मूव्ह होतोय, स्विंग कसा कव्हर करायचा, कुठला बॉल ड्राइव्ह करायचा, नवीन बॉलवर सुरुवातीला बॅट शरीराच्या जास्तीत जास्त जवळ ठेवून डिफेन्सिव शॉट कसा खेळायचा, या गोष्टींचा विचार करताना जास्त कुणी दिसलंच नाही. बॉल पुढं दिसला की मार ड्राईव्ह. तुम्ही नेटमधे कितीही सराव करा, कोच तुम्हाला कितीही टिप्स देऊ दे, जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष खेळपट्टीवर राहून सराव केलेल्या गोष्टी अंमलात आणत नाही, त्या मेंटल ब्लॉकमधून बाहेर येत नाही, तोपर्यंत ह्या सर्व गोष्टी म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी आहे...

आता या सर्व गोष्टी फक्त या सिरीजमधे घडल्या आहेत असं नाही. २०११ पासून १४-१५ टेस्टमधे हेच घडत आलंय.

बरं, ॲन्डरसन, ब्रॉड हे काही बॉलला मंतरलेले धागे-दोरे बांधून बॉलिंग करत नव्हते. इंग्लंडमधे नवीन बॉल, हिरवं पीच, ढगाळ हवामान अशा वातावरणात बॉल स्विंग होणारच. सिमवर पडून कधी आत आणि कधी बाहेर मूव्हमेंट होणारच. अशा गोष्टी हाताळण्यातच तर खरं स्किल असतं. त्यासाठीच तर एवढ्या सगळ्या खेळाडूंमधून अकरा बेस्ट खेळाडू निवडले जातात...

पण जर चॅलेंज स्विकारायचं जिगरच नसेल, गल्ली क्रिकेट खेळण्यातच हे खेळाडू धन्यता मानत असतील, तर वर्षानुवर्षे परदेशात असेच पराभव होत राहतील. आणि प्रत्येक वेळेला राग अनावर होऊन क्रिकेटप्रेमींना सनी देओलचा ड़ायलॉग म्हणावा लागेल -

सिरीजपे सिरीज, सिरीजपे सिरीज, सिरीजपे सिरीज निकलती जा रही है, लेकिन जीत नहीं मिल रही! :-(


Tuesday 8 July 2014

Will it be Rise of The Fallen?



Lush green fields including the pitch, those V-necked sweaters, classical field positions, batsman playing classical shots, and the gentlemen spectators clapping in unison; this is the true identity of England’s test Cricket. And on this mother land of cricket five-match test series would commence from 9th of July. Playing conditions heavily determine which team would get advantage. Be it atmosphere, weather, pitches and strategies. Of these, the main determinant is the 22-yard strip; the pitch. The British batsmen always fail to read the spin and bounce of the red wickets of India. They often look confounded to judge the flight and variations of tailor-made spin bowlers. On the other side, plight of our batsmen does not have different story. They too are susceptible against swing and pace, trademark of English bowling. And green wickets further broaden the vulnerability.



We all know what has happened in the last series in England. We went there with a tag of world champions with the expectation that we would dominate the British and win the series. Instead, we conceded defeats, heavy defeats. We were not even in the contest, let alone looking for a win. The string of injuries, lack of cohesive bowling attack and fragmented team unit further added misery to India’s descending performance. It was the biggest flop show of India’s overseas performances. Assaulted by this performance, Dhoni looked too much eager to pounce on England in the reciprocal series on the home soil. He demanded to lay down rank turners in expection that his spin-spiders would hunt the English players. But the strategy boomeranged, and we again surrendered to Cook’s army which grabbed ‘dugana lagan.’


This time too, the prospects are not much bright. Batting section is too much dependent on super-power Kohli, patient Pujara, and dissent Vijay. Rahane and Dhawan are yet to settle in their roles. Gambhir and Rohit are still reluctant to change their habit of chasing the off-stump deliveries. As far as Dhoni is concerned, everybody knows how much he is interested in playing test cricket on green pitches. His recent performances on foreign wickets have proved weak link at no. 6. This is the position which significantly affects team’s overall run-tally. Ishant, Buvi, Shami supported by a spinner; does this bowling unit have the required penetrating power, the amount of venom to develop the thrust or sting to snatch twenty wickets for winning the test matches? I suspect. We have lost two consecutive test series against England. Will this be the rise of the fallen for India or will British extort ‘tiguna lagan?’

Friday 16 May 2014

Jack Kallis-A 24-karat All-rounder


South Africa is famous for two great things, one- diamond mines and second- all-rounders' mine. Since their entry in the world cricket in 1991 after being banned for their apartheid status in the 70s, they have produced highest number of all-rounder with a quality of 24 karat diamond. In India, our concept about all-rounder is well known! A bowler who manages to bat is termed as an all-rounder irrespective of his bowling or batting quality! But to be a genuine all-rounder, it requires genuine skill. In this department, South Africa ranks highest. They have produced the likes of Brian Mcmilan, Shaun Pollock, Lance Klusener, Hansie Cronje, and the best in the lot classical, versatile, rare talent- Jack Kallis.

The all-rounder species are generally categorized as batting all-rounder and bowling all-rounder. But a player like Jack Kallis would be termed as battling all-rounder; a scarce species and a rare diamond class. The category called battling all-rounder perfectly balances the department of batting and bowling along with the bonus of fielding. Kallis, undoubtedly, can be ranked along with the great legends like Gary Sobers, Ian Botham and Imran Khan. If Sachin was the greatest batsman, say, of the last two decades, Kallis would be, without dispute, termed as the greatest all-rounder of the same era.
Still head, straight bat and ball goes to the fence.

His every shot was a perfect example of batting theory. Still head, bat pad close together, great balance while playing drives, cut, flicks, pull even the defensive shots are exemplary for today's generation.
In the bowling department, too, he was equally impressive like his batting. He had good ability to swing the ball in both ways that too with a considerable pace ranging between 135 to 140 km/hr case. In fact, he would even touch the hot zone of 150 km/hr in his younger days. A captain expects good few overs from his all-rounder with one to two wickets to balance the load of the other bowlers. More or less, Kallis always fulfilled his captains expectation. Adding another versatility, he was a fine slip fielder too.

Eyes on the ball and the balance, immaculate.

 His performance against all teams can be placed in the acceptable quadrant. If we look at his performance against India, the most memorable can be seen as  his 4th innings in the third Test match of 2011 series. India was literally on the verge of victory as S. Africa was reeling at 110 for 7 in the third innings. Jack Kallis, battling with injury, joined M. Morkel and scored a glorious century that not only prevented India's win but also threatened to put India on losing side. That's the sign of a player with enormous ability to change the course of a match which we call as out of the blue.
Right from his debut since1995, he remained integral part of the S. African team, stayed unfazed under any circumstances and gave reliability to his position in the team. Every captain would love to have such versatile player who gives the captain a luxury to balance his side with an extra batsman or a bowler as per the requirement and condition. His batting average of above 50 with nearly 300 wickets in test cricket speak in itself his true caliber and consistency at higher level.
Jack Kallis really was a-24-karat all-rounder of this generation.

Steve Waugh's Mental Disintegration theory.



Hitler's Quote: - Demoralize the enemy from with in by surprise, terror, sabotage, assassination." In the end, victory matters... Steve Waugh was instrumental using this quote for developing his theory- The Mental Disintegration. In the game of cricket, bowlers bowl bouncer, slower deliveries, reverse swing, googly and other available weapons to intimidate the batsman and achieve his wicket. But apart from it, there is an X-factor that enhances the probability of yielding a fruitful result. And Australians are champions in using this X-factor with great effect. However the question arises how and when it started. Not going far behind in the history we can look back at the 80s era. In that era, Australia's intimidating bowlers like Lillie, Thomson, Merve Hughes were used to hurl quick and fiery spell in conjunction with some nasty sledging stuff to unsettle the batsmen. These tactics were being used only during the match depending upon the circumstances. Take an example- When Derek Underwood, Englands unorthodox left arm spin bowler, arrived for the batting, he was welcomed with a bouncer that hit to his hand. Ian Chappell approached him and asked, Which hand was it? To which Underwood replied, Its right. Chappell then said, Oh shit, we were aiming for the left.

raging bull- Merve Hughes


  But it was Steve Waugh who played it systematically, modified it, and used it as a planning tool in the battlefield of cricket giving it the name: - Mental Disintegration Theory. He says, "Entering in to the mind of a player is an art..." and we all know, Australians are master in this art.
 So how it works?
 Rule no. 1:
Distract opposition team from the core course, cricket, and compel them to discuss and think about undue prospects.
When the opposition team arrives, they give controversial comments and add fuel to it by different remarks. e.g. Sachin is more focused on his records, India's batting line up would be vulnerable against express Australian attack. Indian spinners won't get much purchase from the wicket. This stage is named as preliminary stage.
Rule No. 2:
When the series actually starts, the next weapon comes out; Two against eleven on the field. In the initial overs, they prepare for the wickets by bowling bouncers, sharp in and out swingers. and if batsman survives and starts playing some confident shots, they turn to twitting some personal remarks on the batsman.
Some examples:-
Merv Hughes to Robin Smith of England- You f**ing dont know how to bat.
Steve Waugh while planning for Nasser Hussain, We need to place a fielder right under the nose of Hussain. Ian Healy then added, the place could be anywhere in the three mile radius.
In fact I had read, Darrel Cullinan had even consulted to psychiatrist on how to tackle with Shane Warne. This is the extent to which Australia had the hold on few players something like hypnotism.
Rule no.3:
When it seems that the opposition is closing in and trying to grip the situation, the main weapon comes out. They start using abusive language, hurl at the batsman & provoke them. Moreover, wicket-keeper, slip fielders and short leg fielder tease the batsman between bowling change, during break, and also when the batsman gets deceived by good delivery. The question arises, Why all these things are required? Actually, cricket has two aspects. One is technical, and the other one is temperamental. This whole M.D. theory predominantly revolves around the second aspect, the temperamental.

The heat is on

The purpose of this theory is to create a psychological loop or web on the mind of the batsman through sledging, banters and witty comments; eventually, the batsman succumbs to the cumulative pressure created by this M.D. theory. However, implementing this theory is not as easy as it looks. Australia could achieve this because it had the clever captain in the form of Steve Waugh well supported by the legendary bowlers like G. Macgrath, Shane Warnie, Brett Lee, Gillespie, Kasprowich. This power-packed potent bowling unit had the ability to bowl aggressively all the time with immaculate consistency of line and length.
While narrating this theory Steve Waugh had stated, At international level you have to be mentally integrated, or else opposition will disintegrate you. However, sometimes Aussies got too much carried away with it. It was claimed by some players that Australians used very low level, humiliating, groveling language which was beyond tolerable limit. Arjuna Ranatunga, Brian Lara, Ramnaresh Sarwan, Ganguly were amongst the few who got the most of the bitter taste of this theory.
But again in the end, " Kill, Destroy, Sack, Tell lie how much you want, because after victory no one asks why?" and this was the base of Waughs M.D. theory.
Intolerable moment of sledging


Sunday 13 April 2014

“द शो मस्ट गो ऑन!” (खरंच?)

“द शो मस्ट गो ऑन!” (खरंच?)

सध्या देशात दोन आय.पी.एल. गाजताहेत, एक इंडियन पॉलिटिकल लीग, आणि दुसरी इंडियन प्रिमियर लीग. पण माहोल मात्र पहिली गाजवत आहे, इंडियन पॉलिटिकल लिग. टि.आर.पी. आणि जाहिरातींमधेसुद्धा आय.पी.एल. बरंच मागं पडलंय. असो, मुख्य मुद्दा तो नाहिये. सालाबादप्रमाणे यावर्षीही आय.पी.एल.ची जत्रा ठरल्या वेळेप्रमाणे भरणार आहे. एकविरा आईच्या कृपेने काही दिवसांपूर्वी आलेले 'ते' संकट पार पडले आहे. जाहिरातदारांनीही आपापले स्टॉल सजवून जय्यत तयारी केली आहे. हां, थोडासा प्रॉब्लेम आहे तो विलेक्शनमुळे. तेंव्हा संयोजकांच्या या अडचणींमुळे आय.पी.एल.ची जत्रा यावर्षी शेजारच्या गावात सुरु होईल, काही दिवस तिथे मनोरंजन करेल आणि इथला इलेक्शनचा फड संपला, की परत आपल्या गावात हजर होईल; पण काळजी नसावी. या जत्रेतील सामन्यांचे थेट प्रक्षेपण सोनी वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे, क्रिकेटच्या गावकर्‍यांनी थोडे दिवस त्रास सहन करुन सहकार्य करावे.

आता 'त्या' संकटाबद्दल. काय तर म्हणे, आय.पी.एल.च्या मॅचेस फिक्स असतात. नाही, मुदगुल समितीने असा अहवाल सादर केला आहे. श्रीनिवासन, दारासिंग, मय्यपन, सोबत रैना, आणि आय.पी.एल.चे दैवत धोनी यांचे बुकिंसोबत थोडे संबंध आहेत. आणि त्यामुळे आय.पी.एल.मधे काहीतरी काळं-बेरं होत असतं. लोकांना बघवत नाही हो, आय.पी.एल.चे यश. काही झालं तरी हा बिजनेस आहे. थोड्या विघातक शक्ती त्यात विघ्नं आणण्याचा प्रयत्न करणारच. आपण त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे नाही. कारण, आम्हाला नशा चढली आहे, या जत्रेची, सामन्यांची, जत्रेतील मिरवणुकीची. झिंग चढली आहे, या लुटुपुटुच्या लढायांची. मालकांचा संघ आणि मालक म्हणतील त्याप्रमाणे अंमलबजावणी; प्रेक्षकांचे मनोरंजन होते ना, मग एखादा नो-बॉल, एखादी विकेट मुद्दाम टाकली, तर एवढा काय गहजब! संघातील माहिती बुकिला दिली, त्यात गुन्हा तो काय?

थोडी फार सारवा-सारव होईल आणि परत त्याच दिमाखात जत्रा चालू राहिल. तेच संगीत, तीच चमक, तोच उत्साह आणि, परत तीच नशा... कारण "शो मस्ट गो ऑन!", नाही का?

Friday 21 March 2014

क्रिकेट बदलेगा 'एक ओवरमें'


अन्य खेळ बघितले, तर असं दिसतं की सगळ्यांचा फॉर्मट एक, वेळेच बंधन एक, कर्णधार एक आणि कौशल्य, थोड्या फार फरकाने सारखे. पण, क्रिकेट हा खेळ मात्र याला अपवाद आहे.  क्रिकेटची उत्क्रान्ती त्याच्या जन्मापासुन सतत वाढतच गेली. कधी बॅट, कधी बॉल, तर कधी फिल्डिंग, गोष्टी बदलतच गेल्या. गतीशील परिवर्तन हा फंडा नंतर आणखीन गतीशील झाला. नियम बदलत गेले, अर्थातच, बॅटिंग ही क्रिकेटची आवडती गर्लफ्रेन्ड असल्यामुळे बॉलिंगपेक्षा तिला झुकते माप देणारे असे नियम तयार झाले;  आणि आता टी-२० या खेळ प्रकारामुळे तर या गर्लफ्रेन्डचे लाड आणखी वाढले. खेळाचा साचा आणि ढाचा कॉम्प्रेस होत गेला. खेळाचे स्वरूप नॅनो वरून मायक्रो-नॅनो कडे झुकले. चार वर्षातुन एकदा येणारा वर्ल्ड कप, टी-२० च्या बहाण्याने वर्षातून दोन वेळा हजेरी लावू लागला.


खेळाचा प्रकार कोणताही असो, कौशल्य आणि मनोरंजन या दोन गोष्टींची सांगड जुळुन आली, की त्याला चांगला ‘प्रेक्षकवर्ग मिळतो. कसोटी क्रिकेटचा एक दर्दी चाहता वर्ग आहे, त्याला गोलंदाज आणि फलंदाज या  दोघांचा कौशल्यपूर्ण खेळ बघायचा असतो; तर टी-२० ची रॅप, जॅझ ही धुन कौशल्यपूर्ण मनोरंजन या प्रकारात मोडत असल्यामुळे प्रत्येकाला ती आपलीशी वाटते. आता त्याच टी-२०चा वर्ल्ड कप तयार आहे आपला जलवा दाखवण्यासाठी.

सर्व बाजुंचा विचार केला तर, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड, लंका, सा. आफ्रिका हेच संघ बाकीच्यांना बाजुला सारुन वर्ल्ड कप उचलण्यासाठीचे तगडे दावेदार दिसतात. कारण, ह्याच संघांकडे या फॉर्मटसाठी लागणारे सर्व उपयुक्त मटेरियल मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. आता, भारताचा संघ या स्पर्धेत कुठपर्यंत मजल मारणार? हा जिव्हाळ्याचा प्रश्न! २००७ च्या आठवणी काढत, तोच जलवा टीम परत दाखवेल, अशी भाबडी आशा आम्हा सर्व क्रिकेटप्रेमींना आहे, ती तशी प्रत्येक वेळी असते म्हणा. पण, यंदाही मागच्या वेळेप्रमाणेच गणित जुळणं किंवा जुळवून आणणं जरा अवघड दिसतंय. कारणं स्पष्ट आणि नेहमी सारखीच आहेत. भक्कम बॅटिंग, जी दर वेळी मोक्याच्या क्षणी भरकटते, इथे काही वेगळा उजेड पाडेल याची शाश्वती कमी आहे . बरं, विराट आणि धोनी हे काही सुपरमॅन नाहियेत, प्रत्येक वेळी मॅच जिंकुन द्यायला. बॉलिंग…, आता कशाला तोंड उघडायचं; सगळ्यांनी तोंडसुख घेऊन झालं आहे. दर वेळी आपलं “नया है वह “ असं म्हणून वेळ मारून न्यायची. फिल्डिंग; ठिक-ठाक. पण, तीही दोलायमान. कधी अप्रतिम, तर कधी टुकार फिल्डरला लाजवेल अशी. हं, आता स्पर्धा उपखंडात आहे म्हणून स्पिन बॉलिंगच्या आधारे, आणि फ्लॅट-ट्रॅक बॅटिंगच्या सहाय्याने अंधुकशी आशा ठेवता येईल.

“दुनिया बदलेगी एक ओवरमें,” असं म्हणत चॅनेलवाल्यांनी माहोल आधीच तयार केला आहे. त्यात, मॅचेस संध्याकाळी असल्यामुळे क्रिकेटप्रेमींना खोटं बोलुन ऑफिस, कॉलेजला दांड्या मारण्याची फारशी गरज नाही. भरीला सोशल मिडिया आहेच, आपल्या उचंबळलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी. “शेवटची ओवर त्याला द्यायला नको होती रे, हा शॉट खेळायची गरज होती का?”, ते “याला का घेतात रे टिम मधे?, धोनी, नाद करायचा नाही कोणी” या ट्विटस सोबत फेसबुक, वॉट्स-अप यांचे पेजेस मॅच नंतरच्या कौतुकसोहळा, तीव्र भावना, आणि शिव्या यांनी ओतप्रोत भरतील. बरं, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड ते इंडिया, वेस्ट-इंडिज पर्यंतच्या सर्व समर्थकांना ‘आपलीच टीम जिंकणार’ असा दृढ विश्वास आहे. आता, हा विश्वास कोण सार्थ ठरवतो, ते ‘क्रिकेट’च ठरवेल.

Tuesday 25 February 2014

पुन्हा आवडत्या खेळपट्टीवर

आमच्या पोरांनी चांगला खेळ केला, आम्ही टार्गेटच्या फार जवळ गेलो हो, पण….. हा 'पण'च गेल्या बर्‍याच परदेश दौर्‍यांपासून भारताला चिकटून आहे, फेविकॉल पेक्षा जास्त चिवट. आता कारणमीमांसा केली तर, अतंर्गत गोष्टीच जास्त प्रकर्षाने पुढे येताहेत. आणि आता या संघाच्या अंतर्गत गोष्टी कॅप्टन आणि कोच यांनाच सोडवाव्या लागतील.

टीम चांगल्या स्थितीत ठेवून तिला पुढे घेऊन जाणे आणि त्यासाठी त्यातील शिलेदार निवडणे हा कर्णधाराचा हक्क असतो, जेणेकरुन एक चांगला समतोल साधला जाईल. मान्य, पण काही खेळाडुंना पर्यायच नाही आणि तेच सर्वोत्तम, अशा भ्रमात धोनीसाहेब आहेत किंवा तसं दाखवत तरी आहेत. याच भ्रमाचा फायदा घेऊन, भारतीय संघातील नाजूक कळ इतर संघ दाबत आहेत, आणि त्याचा अनावश्यक भार दोन प्रमुख खेळाडू, कोहली आणि स्वतः कॅप्टनसाहेब यांच्यावर पडतोय. एक मध्यमगती अष्टपैलु खेळाडू विदेशी पिचवर हवा आहे हे उमजतंय, पण तो खेळाडू उपलब्ध असूनही त्याचा वापर केला जात नाही, किंवा तो अस्पृश्य असल्यासारखा संघाच्या बाहेर ठेवला जातो. असंच धोरण राहिलं तर ही परवड अशीच चालू राहील.

गोलंदाज चेंडू टाकेल, तो खेळपट्टीवर पडेल, फलंदाज चूक करेल, आणि आपल्याला विकेट मिळेल... असं पक्कं गणित आपल्या कॅप्टनच्या मनात बसलंय! आपले गोलंदाज आणि हाताशी असलेले खेळाडू, यांना योग्य ठिकाणी पेरून विकेट खेचाव्या लागतात, हे धोनी विसरलाय, किंवा टेस्ट क्रिकेट मध्ये त्याला जास्त रुची नाही, असं दिसतंय. गांगुलीने अगदी समर्पकपणे याचे वर्णन एका वाक्यात केले आहे, "सध्याची धोनीची कॅप्टनशीप ही ओंगळवाणी आहे."

आता एशिया कप! आपल्या घरच्याच मातीत. सुंदर अशा निर्जिव, मंद खेळपट्टीवर. जडेजा, रोहित शर्मा, अश्विन या आपल्या धुरंधर, विक्रमी खेळाडूंना पुन्हा स्फुरण चढेल. पुन्हा धावांच्या मोठ्या थप्पी रचल्या जातील, तीनशे काय आणि साडेतीनशे काय! भारत आणि पकिस्तान सामना हे स्पर्धेचे (नेहमीप्रमाणे) प्रमुख आकर्षण ठरणार. बिचारे गोलंदाज! काही सन्माननीय अपवाद वगळले तर, ओव्हरला सहापेक्षा कमी धावा देऊन आपला कोटा कसा संपेल, या चिंतेतच गोलंदाजी करतील. सोबत विकेट मिळाली, तर बोनस मिळाल्याचा आनंद. थोड्याफार फरकाने सर्व एशियन टीम्सचा हाच चेहरा आहे म्हणा. ते म्हणतात ना, अं…. हा!!, "फ्लॅट ट्रॅक बुलीज, घरच्या मैदानावर शिंगे फुटलेले बैल."

Sunday 23 February 2014

Back to the dusty track

Our team played good cricket, we came close, but….. This 'but' has played a big and consistent role in India’s poor performance in the last four away tours. And yet, we are not able to bridge this gap between defeat and victory. There are some micro and macro factors which are contributing to this debacle, the micro factors being more important. And at this level, Dhoni and Fletcher have big roles to play.


Captain always stays at helm and drives his team. So obviously the rights of selection are very much reserved for him. He demands or induces players which he thinks could strike a right balance. But the real fact is that Dhoni is investing in few players with false notion. He is relying too much on his intuition in decision making, including the team combination. Our current batting line-up, in ODI's and Test as well, has the fragility that has been getting exposed by opposition. Also, vacuum created by this fragility is putting too much burden on Kohli and Dhoni himself to salvage the situation. On greenish pitch away from home, team needs a pace-bowling all-rounder, he knows that. But despite having such player in service, he does not give enough chances to him.

Dhoni expects things to get in their place by chance, always. And more often he shows undue reluctance to be creative for diverting adverse situation in to propitious one. All these things are leading to slump in India’s overseas performance. It is getting like ‘India’s performance overseas is inversely proportional to the performance at sweet home.’ Saurabh Ganguly has rightly expressed about Dhoni’s captain-ship, "It's obnoxious!"

Now we are back to our own den ready for Asia cup. We will again cherish those flat, dusty, super-dead pitches. Players like Jadeja, Ashwin, Rohit Sharma would be on track, ready to give that extraordinary performance!  Bowlers, excluding one or two exceptions, would look to finish their quota with less than six runs per over, with wickets as complementary gift. More or less, all the Asian teams are molded in the same theory though. The brand of their own style typically termed as flat pitch bullies!